Posts

Showing posts from July, 2021
Image
निमगावची ऐतिहासिक गढी भिमानदीच्या निळ्याभोर पाण्याच्या प्रवाहाला खेटूनच ही निमगावची ऐतिहासिक गढी आहे.        कोरोना संसर्ग प्रमाण कमी झाल्याने व नुकतीच या आजारावर लस आल्याच्या वृत्ताने जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. दि.१६ जानेवारी २०२१ ला सकाळी ८ वाजता मी पुण्याहून (कात्रज) येथून चाकणला निवासी असणारे आमचे लेखक मित्र श्री.मनोहर मोहरे यांच्याकडे निघालो. भेटीचे नियोजन व इतर चर्चा अगोदरच झाली होती. कात्रज मधेच एका दिवसाचा ७० रुपयेचा बसचा पास घेतला. सकाळी ९ वा.भोसरी येथे पोहोचलो तर राजगुरुनगरला जाणारी बस त्वरित मिळाली. आंबेठाण चौकात ९:४५ ला पोहोचलो. मग मोहरे सरांना मी तेथे उतरल्याचे चलभाषवरून कळविले व ते लगेचच दुचाकी घेऊन आले. मग आमचा दुचाकीचा प्रवास सुरू झाला. भिमानदी पार करून निमगाव येथे पोहोचलो. राजगुरुनगर पासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. गावाचे प्रवेशद्वारासमोर असलेल्या उपहारगृहात गरमा गरम चहा घेतला व प्रवासाचा काहीसा आलेला थकवा घालविला. मग गावातील ऐतिहासिक गढी/ वाडा पाहण्यास निघालो. पूर्वीच्याकाळी संपूर्ण गावाला तटबंदी असावी हे पुरातन गाव प...
Image
मा. विलासराव देशमुखांच्या मामांची गढी… मौजे भाळवणी ता. आष्टी जि.बीड येथे साहेबांचे आजोबा भाऊसाहेब आणि आजी गुणाबाई यांना नानासाहेब, साहेबराव आणि भैय्यासाहेब ही तीन मुले आणि गजराबाई (आण्णासाहेब देशमुख जहागीरदार निलंगा ) कलावतीबाई ( हणमंतराव माने देशमुख अकलूज)व सोजरबाई उर्फ सुशीलाबाई या तीन मुली झाल्या..पैकी सुशीलाबाईंचा विवाह मौजे बाभळगाव ता.जि. लातूर येथील मा. दगडोजीराव देशमुखांशी झाला. त्यांच्याच पोटी मा. विलासराव व मा. दिलीपराव ही दोन मुले झाली. आई सुशीलाबाई सोबत विलासराव लहानपणी भाळवणीला नेहमी यायचे. मामा नानासाहेबासोबत त्यांचे पोहणे फिरणे घोड्यावर दौड मारणे व्हायचे. पुढील पिढीत व्याप आणि गॕप वाढला. तरी साहेब नाते जपणारे असल्याने मुख्यमंञी झाल्यानंतर आवर्जून मामाच्या गावाला लाल दिवा घेऊन आले..तेव्हा पहिला रोड तयार झाला.. खर्ड्याच्या लढाईत पराक्रम गाजवल्यानंतर भाळवणीची जहागीरी आप्पासाहेब निंबाळकरांना मिळाली. तीन एकरावरील किल्लेवजा भव्य गढी त्याला पाच बुरुज, पुढील बाजूस कचेरी आणि बाहेर तबेला तसेच पाण्यासाठी बारव आहे…गढीत जाण्यासाठी देवगिरी किल्ल्याप्रमाणे एकामागून एक तीन दर...
Image
सरदार वाबळे गढी, म्हातार पिंपरी – अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील म्हातार पिंपरी ह्या गावात सरदार जानराव वाबळे यांची सरदार वाबळे गढी म्हणजे तीन वाडे आहेत. हे गाव नगर – दौंड रस्त्यावर आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील पाटसवरून ३५ कि.मी अंतरावर आहे. या तीनपैकी एका वाड्यात काही वाबळे कुटुंबीय राहतात. दोन वाडे अखेरची घटका मोजत आहेत. संपूर्ण गावाभोवती तटबंदी होती. गावाबाहेर एक वेस असून ती उत्तम स्थितीत आहे. तिला चिकटूनच बावळ्यांचे हैबत भैरवनाथ याचे अतिशय मजबूत आणि देखणे असे मंदिर आहे. या मंदिरात एक शिलालेख आहे. त्याच्या मजकुरावरून हे मंदिर शके १६६४ म्हणजे सन १७४२ मध्ये बांधले आहे, हे लक्षात येते. शिलालेखाचा मजकूर खालीलप्रमाणे आहे: ‘श्री म्हातार भैरवनाथ प्रसन्न । तयाचे चरणी दृढ भाव यमाजी वलद यशवंतराव पाटील बावळे मोकादम यांचे पुत्र संताजी व राणोजी व चापोजी व जानोजी यशवंतराव पाटील बावळे मीजे म्हातार पिंप्री सके काल १जु. सुभा सन ११४१ स. १६६४ दुंदुभी नाम संवत्सरे मार्ग शु।। त्रयोदशी देवालय बांधले असे. सामाजी गोधाजी बलद बाबाजी नजीक न.म. श्री. कुलकर्णी मौजे मदजे।।’   यातील ...
Image
जहागीरदार गढी, राजापूर | येल्पाने गढी, येल्पाने By Discover Maharashtra1185   जहागीरदार गढी, राजापूर | येल्पाने गढी, येल्पाने – अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर नं १ या गावात एक गढी आहे. ती गढी जहागीरदार म्हणून ब्राह्मण कुटुंबाची आहे अशी प्राथमिक माहिती गावकर्यांकडून समजली. राजापूर हे गाव शिरूरपासून ढवळगावमार्गे आहे. शिरूरपासून साधारण १० कि.मी अंतरावर आहे. श्रीगोंदा या तालुक्याच्या गावापासून ४३ कि.मी अंतरावर आहे. गढीचे भक्कम प्रवेशद्वार व तटबंदी आजही शाबूत आहेत. आतमध्ये संपूर्ण झाडोरा झालेला आहे. गढीचे वंशज खूप पूर्वीच सोडून गेले. गढीपासून जवळच  कुकडी नदीच्या काठावर एक पुरातन शिवालय आहे. बाहेर वीरगळी आहेत.  भिंतीवर अस्पष्ट शिलालेख आहे. गावात गोविंदमहाराजांचे मंदिर आहे त्याच्याबाहेर एक वीरगळ आहे. गढीचे बांधकाम १८ व्या शतकात पेशवे काळात झाले असावे असा अंदाज आहे. जाणकारांनी याबद्दल आपल्याकडे असलेली माहिती द्यावी. येल्पाने गढी, येल्पाने –   अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील येल्पाने गावात पूर्वी गढी होती. सद्यस्थितीत गढीचे प्रवेशद्वार...
Image
  देशमुख गढी, डोंगरकिन्ही – बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही गावात देशमुखांची गढी आहे. पाटोदा हे तालुक्याचे गाव बीडपासून ५० कि.मी अंतरावर आणि डोंगरकिन्ही पाटोद्यापासून १७ कि.मी अंतरावर आहे. गढी आता अखेरची घटका मोजत आहे. गढीची तटबंदी आणि काही बुरूज शिल्लक आहेत. आतील सर्व आणि बाकी बुरूज, तटबंदी पूर्णपणे ढासळले आहे. एकूण ४-५ एकरावर असलेली ही गढी त्याकाळी किती वैभवशाली असेल ह्याची साक्ष देते. पूर्वी वतनदार, जहागिरदार, पाटील लोकांच्या गढ्या असत त्यापैकीच ही असावी. ह्यांचे वंशज पुणे, मुंबईत असतात त्यामुळे देखभाल होत नाही. गावकर्यांनाकडे इतिहास उपलब्ध नाही. तरी जाणकारांनी माहिती द्यावी ही विनंती.ह्यांचे वंशज पुणे, मुंबईत असतात त्यामुळे देखभाल होत नाही. गावकर्यांनाकडे इतिहास उपलब्ध नाही. तरी जाणकारांनी माहिती द्यावी ही विनंती.
Image
  मोरे गढी, सानप गढी, सौताडा – बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सौतडा गावात दोन गढी आहेत. सौतडा हे गाव मराठवाड्यातील विंचरणा नदीवर असलेल्या भव्य धबधब्यासाठी प्रसिद्ध आहे. पण गावात मोरे आणि सानप यांच्या गढ्या आहेत. दोन्ही गढ्या अखेरची घटका मोजत आहेत. सौतडा गाव पाटोदा या तालुक्याच्या गावापासून १८ कि.मी अंतरावर आहे. सानपांची गढी थोड्याफार प्रमाणात तग धरून उभी आहे. गढीची तटबंदी आणि बुरूज आजपण मजबूत आहेत. खालचे काम दगडी आहे तर वर वीटांचे काम होते ते काळाच्या ओघात पडून गेले व पांढरी माती पहायला मिळते. गढीत प्रवेश करताना दारातच एक छोटेसे मंदिर आहे. लहान प्रवेशद्वार आहे. आतमध्ये पडक्या वाड्याचे अवशेष आहेत.   मोरे गढीची तटबंदी, बुरूज पूर्णपणे ढासळले आहेत. तुरळक तटबंदी आणि प्रवेशद्वार पहायला मिळते. प्रवेशद्वाराचे वीटांनी केलेले रेखीव काम आहे. असा हा सौतडा गावाचा वारसा आहे. वंशज पुण्यात असतात स्थानिक पण उदासीन असल्याने ह्याचे जतन नाही. इतिहास पण माहित नाही तरी जाणकारांनी इतिहासावर प्रकाश टाकावा.